नवी दिल्ली : देशात पुढील तीन आठवडे म्हणजे 21 दिवस संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ही एका प्रकारची संचारबंदीच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. देशातील प्रशासन आणि शासनाचे करोना व्हायरस विरोधात तुमचा लढा सुरु आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत, असा संदेश संयुक्त राष्ट्राकडून भारताला देण्यात आला आहे. अशातच, २१ दिवस लॉकडाउन घोषित करण्याच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.
२१ दिवस लॉकडाउनबाबत मोदी म्हणाले होते की,’कोरोनाला आपण पराभूत केले नाही तर आपण अनेक वर्ष मागे पडू, असा इशारा देत ते म्हणाले, हिंदुस्थानला वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे,या काळात आपल्या घराबाहेर पडण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आहात तेथेच रहा. आपण आपल्या घरात राहणे हे प्रत्येक घराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. जर हे बंधन पाळले गेले नाही तर अनेक परिवार बरबाद होऊन जातील, असे ते म्हणाले होते.’