मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्रातील त्यांच्या स्वत:च्या पक्षात किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही पाठिंबा मिळत नाही, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री शेलार म्हणाले,राऊत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकाकी पडले आहेत. राज्यसभा सदस्य असलेले संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी, केंद्रीय यंत्रणांमार्फत शिवसेना नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला होता. ईडीने काही प्रकरणांमध्ये राऊत यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे असे ते म्हणाले.
राऊत गेल्या सात वर्षांपासून “भाजपची बदनामी” करत होते, परंतु ईडीचे अधिकारी या काळात त्यांच्याविरुद्ध कोणतीही चौकशी करत नव्हते,असेहीं त्यांनी निदर्शनाला आणून दिले. राऊतांच्या समर्थनार्थ आता सेनेचा एकही नेता बोलत नाही, त्यामुळे मला राऊत यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागून राहिली आहे, असा टोमणाहीं त्यांनी मारला.