उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेन’ असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपली बाजू मांडली आहे असं म्हणत एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’बाळासाहेबांच्या जिवाला अतिरेक्यांपासून धोका होता, तेव्हा राणे साहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता त्यांचं संरक्षण केलं. त्याच राणेसाहेबांना मारुन टाकण्याची सुपारी देणारा हा उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेला ओळखलं पाहिजे, हा कपटी माणूस आहे” असं राणे म्हणाले.
दरम्यान, २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपची महायुती तुटली. अन् दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली. यानंतर महायुतीचे सरकार राज्यात आले. या घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांवर आपली भूमिका मांडली आहे.