25 हजाराचा तात्पूरता जामीन मंजूर
मुंबई: रेल्वेत नियुक्तीची बनावट पत्र देऊन 21 जणांना 65 लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी अटक पतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रश्मी मंडणकर हिला उच्च न्यायालयाने तात्पूरता दिलासा दिला. जर अटक करण्यात आली तर 25 हजारांच्या वैयक्तीक जामीनावर सुटका करण्यात यावी, असे स्पष्ट करून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सातारा जिल्ह्यातील तरूणांना रेल्वेत नोकरीचे आम्ही दाखवून प्रमुख आरोपी अमोल मंडणकर आणि त्याच्या साथीदारांनी सातारा जिल्ह्यातील 21 तरूणांना सुमारे 65 लाखाचा गंडा घातला. या तरूणांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट नियुक्त पत्रेही दिली. मात्र कोलकत्याला नियुक्तीला गेलेल्या या तरूणांना फोन करून मुंबईला उपस्थित राहण्यास सांगितले. यावेळी आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर अभिजित साळंखे यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिसांकडे तक्रार केली.
आरोपी आणि साथीदारांसह त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रमुख आरोपी अमोल मंडणकर अटक झाल्यानंतर त्याची पत्नी रश्मीने सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झाला. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर ऍड. निरंजन भावके यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. तसेच अर्जाची सुनावणी 20 स्पष्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.