जालना – राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी जी वक्तव्ये केली आहेत ती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस बरोबरची आपली आघाडी तोडली पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेश महाराष्ट्रभर पोहोचवला आणि आता त्यांचा मुलगा आणि नातू सावरकरांचा अपमान करणाऱ्या पक्षासोबत बसले आहेत.
राहुल गांधी यांच्या संबंधात दानवे यांनी म्हटले आहे की, अशी विधाने अशा व्यक्तीकडून आली आहेत ज्यांना इतिहासाचे किंवा महान व्यक्तिमत्त्वांचे अजिबात ज्ञान नाही.
भाजप सावरकरांची विचारधारा स्वीकारते. सावरकर आमच्या विचारात, मनांत, आचरणात आहेत असेही दानवे म्हणाले.