मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वीर सावरकर ‘स्वातंत्र्यविर होते की माफीवीर’ याभोवती फिरत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातून भाजपासह मनसे आक्रमक झाल्याचे दिसले होते. त्याचबरोबर मनसेकडून भारत जोडो यात्रेला रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता. अशातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय वातावरण तापवले आहे. कोश्यारींच्या वक्तव्यावर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“पात्रता नसलेला माणूस…”, रोहित पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपालांनी केले.
“पात्रता नसलेला माणूस…”, रोहित पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
यावर मनसे नेते गजानन काळे यांनी राज्यपालांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, अशा शब्दांत काळे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मात्र यामध्ये मनसेच्या वतीने गजानन काळे यांनी राज्यपालांना खडसावले असले तरी राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. वीर सावरकरांच्या मुद्द्यावर ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका त्यांनी राज्यपाल कोश्यारींच्या बाबतही घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
गजानन काळे यांचे ट्विट
“राज्यपालांनी सुधारायच नाही अस ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता ? गडकरीजी,पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ,वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा.”
राज्यपालांनी सुधारायच नाही अस ठरवलेलं दिसतंय.
ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता ? गडकरीजी,पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ,वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील.
कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 19, 2022
राज्यपाल कोश्यारींनी म्हटले होते
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”