नवी दिल्ली : पहिल्या डावात ४२७ धावा करणा-या मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव २५८ धावांवर संपवला व १६९ धावांची मोठी आघाडी घेतली. व्यंकटेश अय्यरने मुंबईला चांगलाच प्रतिकार केला मात्र तो बाद झाल्यानंतर मुंबईच्या अंकुश जयस्वालने ४ गडी बाद करत त्यांचा डाव संपविला. शतक करण्यात अपयशी ठरलेला अय्यर ९३ धावांवर बाद झाला.
मोठी आघाडी घेत मुंबईने आपला दुसरा डाव सुरू केला व आकम्रक फलंदाजी करत ५ बाद २३८ धावांवर डाव घोषित केला. मुंबईने मध्य प्रदेशसमोर आता निर्णायक विजयासाठी चारशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले.
End Innings: Mumbai – 238/5 dec in 48.5 overs (Hardik Jitendra Tamore 113 off 132, Aditya Tare 1 off 2) #MUMvMP @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 14, 2020
या आव्हानाचा पाठलाग करताना शुक्रवारी मध्य प्रदेशने तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या दुस-या डावात २ बाद ४४ धावा केल्या असून त्यांना आणखी ३६४ धावांची आवश्यकता आहे.
WICKET! Over: 19.1 Anand Singh Bais 5(26) b Ankush Jaiswal, Madhya Pradesh 41/2 #MUMvMP @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 14, 2020
मध्य प्रदेशला बाद फेरीची संधी आहे तर मुंबईचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.