Ramdas Kadam । शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावर जागावाटपासून संताप व्यक्त केला होता. ‘महाराष्ट्र भाजपा जे शिंदे गटासोबत जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत.
ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं.’ असं म्हणत कदम भडकले होते
अशात आता त्यांच्या टीकेमुळे महायुतीत राजकारण तापले होते. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत टीका केल्याच्या काही तासातच राज्य सरकारकडून पत्रक काढून मोठी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडळाचे पूर्वअध्यक्ष ए एल जऱ्हाड हे अनेक दिवस गैरहजर असल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. रामदास कदम यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्रामुळे राज्य सरकारने शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्यांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा
Katrina Kaif | फराह खानने केला खुलासा ‘तीस मार खान’साठी कतरिना कैफला कास्ट करायचे नव्हते, तर..’