Ram mandir : राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अयोध्येत रामललाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अयोध्येत तुम्ही रामाचे दर्शन घेऊ शकाल, परंतु त्यांना हार, फुले किंवा नारळ इत्यादी अर्पण करू शकणार नाही.
राम मंदिर आंदोलनापासून देवाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना कोणतीही वस्तू सोबत नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना त्यांचे सर्व सामान मंदिराबाहेर ठेवावे लागते. नंतर, कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी, बहुतेक मंदिरांमध्ये हार, फुले किंवा नारळ अर्पण करण्यास बंदी घालण्यात आली.
आजही अशीच व्यवस्था अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सुरू आहे. म्हणजेच भक्तांना येथे देवाचे दर्शन घेण्याची परवानगी आहे, परंतु त्यांना हार, फुले किंवा नारळ अर्पण करण्याची परवानगी नाही.
विहिंप नेते शरद शर्मा यांनी , राम मंदिराच्या अभिषेकनंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोक मोठ्या संख्येने येत आहेत आणि नवीन मंदिर, देवाचे दर्शन घेऊ इच्छितात. दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाख ते दीड लाखांपर्यंत असू शकते, असा अंदाज आहे. परंतु भक्तांना दर्शनाच्या वेळी प्रभू रामाला हार, फुले किंवा नारळ अर्पण करण्याची परवानगी नाही. मात्र भक्तांना देवाचा प्रसाद मिळणार असल्याचे सांगितले.