Ram Mandir – अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर समितीने या दिवशी मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले असून हजारो लोकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवले आहे. तसेच हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची राजकीय स्टंटबाजी आहे.
यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्थगिती द्यावी, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच याचिकाकर्त्याने चार पीठांच्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर घेतलेल्या आक्षेपांचा दाखला दिला आहे.
गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आरोप केला आहे की, भाजप २०२४च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचा राजकीय फायदा साधण्यासाठी घाईघाईने २२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. हिंदू धर्मात पौष महिन्यात कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत.
त्याचबरोबर मंदिरदेखील अद्याप बांधून तयार झालेले नाही. अपूर्ण मंदिरात कोणत्याही देवी-देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी या सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. तसेच शंकरायार्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले असल्याचेही याचिकेत नमूद केले आहे.