Lok Sabha Election 2024 | निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे.
तारखा जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहे. अशात मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केले आहे.
Lok Sabha Election 2024 | काय आहे राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण pic.twitter.com/M3W9eA8FaJ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 16, 2024
‘लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा. राज ठाकरे यांनी मदतदारांना एक प्रकारे मोठे आवाहनच केल्याचे बघायला मिळतंय अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच’ असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावर आता युजर्स यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर्स ने थेट राज ठाकरे यांच्या पोस्टवर कॉमेंट्स करत,’48 उमेदवार उभे करण्याची तुमच्यात ताकद आहे. सुसंस्कृत पक्ष म्हणून महाराष्ट्र तुमच्या कडे पाहतोय.’ असं म्हणत प्रश्न विचारला आहे.
48 उमेदवार उभे करण्याची तुमच्यात ताकद आहे. सुसंस्कृत पक्ष म्हणून महाराष्ट्र तुमच्या कडे पाहतोय.
— मिलिंद सुलोचना दत्ताराम ठाकुर (@Milindthakur79) March 16, 2024
तत्पूर्वी, महाराष्ट्र नवर्निमाण सेना महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा मनसेला देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत राहिल्यास विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेंना मनसेची मदत होणार आहे. त्यासाठी मनसेला थेट महायुतीत न घेता शिवसेनेच्या दोन जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. यात मनसेच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावरूनही राज ठाकरे यांच्या पोस्टवर युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे.