लाहोर – विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर लोकेश राहुल व रोहित शर्मा यांचा कर्णधारपदी विचार केला जात असला तरीही या दोघांकडे कोहलीच्या नेतृत्वाचा दर्जा नाही, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कसोटीपटू रशिद लतिफने टीका केली आहे. हे दोघे खेळाडू कोहली कधी राजीनामा देतो व आपल्याला ही जबाबदारी सोपवली जाते याचीच वाट पाहात होते, असे ताशेरेही लतिफने ओढले आहेत.
कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित आणि राहुलने त्याचे स्वागत केले. मात्र, तेव्हा हे दोघे तो कधी निवृत्ती घेणार याचीच जणू वाट पाहात होते. कोहली हा जागतिक स्तरावरील खेळाडू आहे. भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल. रोहितला तंदुरुस्तीचा प्रश्न सातत्या भेडसावतो. त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण दौऱ्यामध्ये खेळताना दिसला नाही. म्हणजेच रोहित सध्या फीट नाही. राहुल कर्णधार होण्याच्या योग्यतेचा नाही, असेही लतिफने म्हटले आहे.
मला या खेळाडूंचे वर्तन उमगले नाही. कोहलीला एक चांगला कर्णधार समजता तर तुम्ही त्याचा कर्णधार पद सोडण्याचा निर्णय इतक्या सहजपणे कसा स्वीकारला. असेच वाटले की ते वाटच पाहत होते की कोहली कर्णधारपद कधी सोडतोय, असेही त्याने म्हटले आहे.
कोहली आणि बीसीसीआय तसेच अध्यक्ष सौरव गांगुली यंच्यात जे काही घडले ते टाळता आले असते. आता कोहली मुक्तपणे फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करु शकतो. निदान आता तरी बीसीसीआयने त्याला पाठींबा द्यायला हवा. वाद टाळून पुडे जायला हवे, असेही लतिफने म्हटले आहे.