नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. कोहलीच्या या निर्णयावर नवोदित वेगवान गोलंदाज महंमद सिराज याने भावनीक प्रतिक्रीया सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.
कोहलीने नव्या खेळाडूंना कायमच पाठींबा दिला, त्यांच्या चुका सावरुन घेत त्यांना प्रोत्साहन दिले. मला तर त्याने कायमच खडतर प्रसंगी साथ केली. असा कर्णधार पाठीशी असेल तर कोणताही खेळाडू मानकिसरीत्या कमकुवत होणार नाही, असे सिराजने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.