काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे वायनाड आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
Union Minister Smriti Irani on Congress President Rahul Gandhi: He enjoyed a position of power for 15 years because of the support from Amethi, but now he is going to file nomination from elsewhere.This is an insult of Amethi and people here will not tolerate this. pic.twitter.com/qbadbPCrW1
— ANI (@ANI) April 4, 2019
दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा 2014च्या लोकसभा निवडणुकांमधील राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या वायनाड मधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एका प्रसिद्ध संस्थेला बोलताना त्या म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता उपभोगली आहे मात्र आता ते हे वायनाड येथून देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याने हा अमेठी येथील जनतेचा अपमान आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी अमेठीच्या जनतेचा केलेला हा अपमान जनता कदापि सहन करणार नसून याचे परिणाम निवडणुकांच्या निर्णयाद्वारे दिसतीलचं”