नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोक आता पंतप्रधानांना सांगत आहेत की एलपीजी दरवाढ, इंधनाच्या किमती यासारखे अडथळे त्यांनी निर्माण केले आहेत.
“गब्बर टॅक्स लूट” आणि “बेरोजगारीची त्सुनामी” यांनी लोकांना थकवले आहे आणि हे प्रकार आता थांबले पाहिजेत. मोदींनी याद्वारे लोकांपुढे अडथळे उभे केले आहेत. पण तरीही लोक या आव्हानांना तोंड देत लढत आहेत. पण मोदींनी आता थांबले पाहिजे लोकांना त्यांनी आणखी थकवता कामा नये, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या आषाढीवारीसाठी टोलमाफी आदेशानंतरही वसुली; अधिकारी कर्मचाऱ्यांसह चौघांवर गुन्हा
भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 157 टक्क्यांनी वाढल्या, इंधनाच्या किमतींनी सर्व विक्रम मोडले आणि “बेरोजगारीची त्सुनामी” आली आहे, असा आरोप त्यांनी केला.
सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली; पाणलोट क्षेत्रात हंगामातील विक्रमी पाऊस