पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकसवाला धरणसाखळीतील चारही धरणांमधील गेल्या 24 तासात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील 24 तासात धरणसाठयात तब्बल 1.14 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून या चारही धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 6.95 टीएमसी झाला आहे. महापालिकेने शहरात काटकसर करून तसेच पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास शहराला सहा महिने पुरेल एवढे हे पाणी आहे.
मागील आठवडयापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली होती. 2 जुलै रोजी या चारही धरणांचा पाणीसाठा 2.60 टीएमसी होता. हा साठा आठ दिवसांनी 6.5 टीएमसी झाला आहे. तर मागील तीन दिवसांपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस सुरू असल्याने धरणात ओढे, नाले तसेच जोडनद्यांमधून मोठया प्रमाणात पावसाचे पाणी येत असल्याने धरणसाठयात झपाटयाने वाढ होत आहे.
घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीवरून भाजप खासदाराचा घरचा आहेर…
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात खडकवासला पाणलोट क्षेत्रात 30 मिमी, पानशेत धरणात 145 मिमी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 140 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 192 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शनिवारी सायक़ांळ नंतर या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला असून हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर 11 जुलै पर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे, या तीन दिवसात पाणीसाठा लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असा आहे धरणसाठा ( टीएमसी आणि टक्केवारी )
खडकवासला -0.96 …… 49 टक्के
पानशेत- 2.74……………26 टक्के
वरसगाव- 2.80 …………..22 टक्के
टेमघर – 0.45 …………..12 टक्के
———————-
एकूण 6.96 टीएमसी 24 टक्के
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचे दिल्लीतून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर….