मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्याच्या राजकीय कटुतेच्या काळात असे प्रकार दुर्मिळ होत चालले आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयीही कौतुगोद्गार काढले. राहुल गांधी यांनी देशवासीयांमध्ये प्रेम आणि करुणेची भावना जागृत करण्यासाठी काढलेल्या या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणारे वक्तव्य केल्याने शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्याशी साधलेल्या संपर्काला महत्त्व दिले जात आहे.
Indonesia earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का, किमान 46 जण ठार
राऊत यांनी राहुल गांधी यांनी फोनवरून त्यांची जी विचारपूस केली त्याविषयी सोमवारी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी तुमच्या राजकीय सहकाऱ्याची चौकशी करणे हे मानवतेचे लक्षण आहे! भारत जोडो यात्रेच्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात राहुल गांधींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काल फोन केला. 110 दिवस तुरुंगात घालवलेल्या राजकीय सहकाऱ्याच्या वेदना जाणून घेऊन त्याच्याविषयी सहानुभूमीत व्यक्त करण्याच्या त्यांच्या या कृतीची मी प्रशंसा करतो. राजकीय कटुतेच्या काळात असा संवाद साधण्याचे प्रसंग दुर्मिळ होत आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.