Rahul Gandhi on Account Freeze । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (21 मार्च) पक्षाची खाती गोठवल्याबद्दल केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशात लोकशाही नाही, असा दावा त्यांनी केला.
‘भारतातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. आज काँग्रेसकडे आपल्या नेत्यांच्या मदतीसाठी दोन रुपयेही नाहीत. निवडणुकीचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत.’ असेही राहुल गांधी म्हणाले आहे.
Rahul Gandhi on Account Freeze । नेमकं काय म्हणाले राहुल गांधी…
‘देशातील प्रत्येकाला माहित आहे की, जेव्हा त्याचे बँक खाते, एटीएम कार्ड किंवा त्याची आर्थिक ओळख पुसली जाते तेव्हा किती त्रास होतो. हे जर कोणत्याही कुटुंबासोबत केले तर ते उपासमारीने मरतील. काँग्रेसबाबतही असेच झाले आहे. महिनाभरापूर्वी आमची खाती गोठवण्यात आल्याने आम्ही आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पैसे देऊ शकत नाही.”
सरकारने खाती गोठवल्याचा आरोप करत राहुल गांधी काँग्रेस नेते म्हणाले, ‘आमच्या नेत्यांना विमानाने प्रवास करता येत नाही. ते रेल्वेनेही प्रवास करू शकत नाहीत. आमच्या नेत्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवणे अवघड झाले आहे. आज आम्ही जाहिरात करू शकत नाही. देशातील 20 टक्के जनता आम्हाला मतदान करते, पण आज आम्ही 2 रुपये देऊ शकत नाही. निवडणुकीत आम्हाला पंगू करण्यासाठी हे केले गेले आहे.”
Rahul Gandhi on Account Freeze । राहुल गांधी यांनी पंतप्रधान-गृहमंत्र्यांबाबत म्हणाले…
“आमच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करणे कठीण झाले आहे. एकप्रकारे ही गुन्हेगारी कारवाई आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करत आहेत.” असा आरोपही त्यांनी लावला आहे.