पुणे – क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणात थेट पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. यानंतर कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये दहावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न समोर आला आहे.
याप्रकरणी दोन सतरा वर्षाच्या मुलांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार बुधवारी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. तर आज (गुरुवारी) सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
…..क्रिकेट ठरले भांडणाचे कारण
दोन्ही गटातील मुले एकाच परिसरात रहातात. यातील काही जणांची दहावीची परिक्षा सुरु आहे. मात्र परिक्षा असतानाही ते सलग पेपर नसल्याने मधील सुटीच्या काळात मैदानावर क्रिकेट खेळायला जमा होत होते. दोन्ही गटाच्या टीम तयार करुन अगदी ५० ते २०० रुपयापर्यंत मॅच लावली जात होती. दोन दिवसांपुर्वी मॅच झाल्यावर हरलेल्या गटातील मुलाने एकाला जाताजाता शिवीगाळ केली.मात्र तेव्हा दुसऱ्या गटाने कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. घरी गेल्यावर मात्र एकमेकांशी फोनाफोनी करुन शिवीगाळीचा जाब विचारण्याचे ठरले.
त्यानूसार दुसऱ्या गटातील मुलाला फोन करुन जाब विचारला गेला. यानंतर एकत्र जमून वाद मिटण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे दोन्ही गट बुधवारी सायंकाळी सात वाजता संतोेनगर येथे एकत्र जमले. तेथे आठ जणाच्या गटाने फिर्यादी त्याचे दोन अल्पवयीन साथदार आणि ऋषीकेश बर्डे (२३,रा.शिवापुर) यांस हाताने मारहाण केली. त्यानंतर रोहन पवार यादे कमरेची पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने त्याला मागून पकडले. यामुळे त्याने पिस्तूलातून गोळी जमिनीवर झाडली.
यानंतर फिर्यादी व त्याच्या साथीदारांना डोक्यात, हातावर आणि मनगटावर वार केले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीनूसार आर्म ॲक्ट आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ऋषीकेश बर्डे व इतरांनी दुचाकीवर येऊन हाताने आणि कोयत्याने मारहार केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.