नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत, “ही ‘मित्रकाल’ विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र आहे आणि सत्य हेच माझे आश्रयस्थान आहे.”
राहुल गांधींना सुरत न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “योद्धे विचलित होत नाहीत, एका क्षणासाठीही ते धीर खचत नाही, ते अडथळ्यांना मिठी मारतात, काट्यांमधून मार्ग काढतात.” असे त्यांनी म्हटले आहे.
ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है।
इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा! pic.twitter.com/SYxC8yfc1M
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 3, 2023
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी (३ एप्रिल) दुपारी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत विमानाने सुरतला पोहोचले आणि त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयात रवाना झाले. याच्यासोबतच काँग्रेसशासित तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ नेतेही न्यायालयात पोहोचले होते.
गेल्या महिन्यात सुरत तेथील ट्रायल कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबद्दल आपल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केले होते.