Bharat Jodo Nyay Yatra । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे, ही यात्रा २० मार्च ला पूर्ण होणार होती, आता ही यात्रा १० दिवसांपूर्वीच पूर्ण होणार आहे, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर या यात्रेमध्ये बदलावं करण्यात येणार आहे. सध्या हि यात्रा ओडिसामध्ये आहे. राहुल गांधी यात्रेमधून ब्रेक घेत दिल्लीत आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या १६ फेब्रुवारीला चांदोली मार्गे उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार असून येथे १० दिवस हि यात्रा होणार होती. या राज्यातील २० जिल्हे राहुल गांधी कव्हर करणार होते.
मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलाय. उत्तरप्रदेशमध्ये १० दिवस नाही तर फक्त ६ ते ७ दिवस ही यात्रा असणार आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव सुद्धा रायबरेलीतून यात्रेत सामील होणार आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीला मणिपूरमधून सुरु झाली.
हेही वाचा :
राहुल गांधींचं वादग्रस्त विधान म्हणाले,’PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर…”
१०० किलोमीटर रोज पूर्ण करणार प्रवास
राहुल गांधी रोज पायी चालत ७० किलोमीटरचा प्रवास करतील. उर्वरित प्रवास हा बस कारने करणार आहे. असा ऐकून १०० किलोमीटर प्रवास रोज पूर्ण करणार आहे. राहुल यांच्या वेगामुळे प्रवास लवकर पूर्ण होत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रवास लवकर संपावा आणि संघटना तिकीट वाटप आणि आघाडीच्या चर्चेसोबतच राहुल यांनी निवडणूक प्रचारात उतरावे अशी काँग्रेसचीही इच्छा आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींच्या ‘त्या’ व्यक्तव्यावर जरांगे म्हणाले; “आमचे आरक्षण मिळाल्यात जमा, ते बोलले खूप झाले…’