विश्रांतवाडी – साडेतीन हजार कचरा वेचक असणारी स्वच्छ ही संस्था पुणे शहरातील कचरा ही घरोघरी जाऊन गोळा करत असते. परंतु, महापालिकेत समाविष्ट गावांचे मात्र स्वच्छ संस्थेला वावडे आहे का, कारण अशा गावांत कचरा व्यवस्थापन योग्यरित्या होत नाही, याबाबतची महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असल्याचे लोहगावचे युवा कार्यकर्ते सुशांत माने यांनी सांगितले.
पुणे महापालिका व स्वच्छ या संस्थेचा करार संपुष्टात आल्याने पालिका आयुक्तांनी नव्याने करार करण्यास मान्यता दिली, त्यामागे 5 कोटींएवजी 8 कोटींचा निधी दिला जाणार आहे. परंतु, अद्यापही अनेक भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत नाही. अनेक ठिकाणी स्वच्छ कर्मचारी पोहोचत नाहीत, त्यामुळे पर्यायाने त्या सोसायटीमधील कचरा हा रस्त्यावर आणून टाकला जातो.
काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची अनियमितता आढळून येते यावर अंकुश असावा. एकंदरीत स्वच्छच्या कामाचा विचार केला तर क्षेत्रफळाप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या ठरवावी, अशी मागणी लोहगावचे युवो कार्यकर्ते सुशांत माने यांनी केली आहे.