पुणे – कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे राज्यात सध्या पुन्हा हलका गारवा निर्माण झाला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आल्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. पुढील पाच दिवस तापमान कमीच राहणार असून तापमानात विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. सर्वत्र किमान तापमान सारसरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटले होते. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 7 अंशाखाली गेला होता.
पण, डिसेंबर महिन्यात तापमानात बरेच चढ उतार पहायला मिळाले. डिसेंबरमध्ये किमान 7 तर कमाल 34 अंश तापमानाची नोंद झाली होती. मागील काही दिवसांत राज्यात प्रामुख्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात तापमान सरासरीपुढे जाऊन थंडी गायब झाली होती.