मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
राजगुरूनगर : शिवसेना धनुष्यबाणावरच निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) संकल्प अभियान मिशन 48 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले त्यानंतर कार्यकर्ता मेळावा तथा मनाच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर राजगुरूनगर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी यावेळी उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्य मंत्री विजय शिवतारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता राज्यात मिशन 48 संकल्प अभियान सुरु केले आहे. राज्य सरकाने केलेली कामे आणि केंद्राने केलेली मदतीमुळे राज्य प्रगतीपथावर आहे. कामाच्या जोरावर केंद्राचे पाठबळ मिळाल्याने महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर आहे. दोन कोटी लोकांना शासन आपल्या दारी याचा लाभ मिळाला आहे.
राज्यात मोठा चमत्कार होणार असून 45 जागा आम्ही जिंकणार आहोत. अडीच वर्षांत अनेक प्रकल्प विरोधकांनी बंद ठेवले. नको ते आरोप केले मात्र केंद्राच्या पाठबळामुळे राज्यात अनेक प्रकल्प आले उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर विकासकामे लोकापर्यंत पोहचवून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
जागा वाटपाच्या बाबत चर्चा नाही
48 पैकी 45 प्लस जागा आम्ही जिंकणार.आरपीआयसह मित्र पक्ष मिळून महायुती आगामी निवडणूक लढवत आहोत. मित्र पक्ष नाराज नाहीत. जागा वाटपाच्या बाबत चर्चा झाली नाही .मुख्य उद्देश नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे यात राज्याचा मोठा वाटा असावा हा आहे. हेच टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा दृढ विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.