प्राचार्य डॉ. गायकवाड : आवटे महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा सप्ताह
मंचर : मराठी भाषाला समृद्ध वारसा आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते कवी ग. दी. माडगुळकरांपर्यंतच्या सर्व कवींनी तर आताचे नवोदित कवीपर्यंत आपल्या काव्य लेखनाने मराठी कविता व मराठी साहित्य, भाषा समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे, असे मत प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताह प्रसंगी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. निबंधलेखन, काव्यलेखन प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचे या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील 110 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
तसेच या भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात महाविद्यालयातील मराठी विभाग व साहित्य परिषद मंचर शाखा यांच्या संयुक्त विद्यामाने काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी निमंत्रित कवी दत्ताजी पायमोडे, ज्ञानेश्वर धुमाळ, शकील जाफरी, रूपा बेंडे, विठ्ठल महामुनी, मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी प्रा. संतोष पवार यांनी कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होऊन कविता सादर केली.
काव्यसंमेलनात महाविद्यालयातील विद्यार्थीनी अर्चिता गायकवाड, प्रतीक्षा साबळे, संगीता वळसे, मिताली मंडले, तृप्ती बांगर, कार्तिकी पोखरकर या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन करून आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. बाळासाहेब गार्डी यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. एस.एस रूपनर यांनी तर प्रा. राधाकिसन मुठे यांनी आभार मानले.