विजेच्या लपंडावाने व्यावसायिक त्रस्त
आळंदी – हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यातच मान्सूनचे आगमन होणार होते; परंतु आठ दिवस उशिरा का होईना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास मान्सून सरी कोसळल्या.
सकाळपासून आळंदीकरांना उकाड्याने अगदी हैराण केले होते. साडेतीनच्या सुमारास हवेत ढग निर्माण होऊन काही काय वादळ वारा सुटला. तद्नंतर ठीक चार वाजता मान्सूनने आपली पहिली हजेरी लावत धो धो बरसण्यातून सुरुवात केली.
तब्बल दोन तास म्हणजेच सहा वाजता मान्सूनचे धो धो बरसणे थांबले. सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे.
आळंदीतील सर्व रस्ते वाहतूक कोंडीने तुडुंब भरले होते. पाणी रस्त्यावर वाहत होते त्यातच विजेने नेहमीप्रमाणे लपंडव खेळत सर्वत्र अंधार झाल्याने व्यापारी वर्गाची तसेच स्थानिक नागरिकांची सुमारे तीन तास गैरसोय झाली.