मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन घाल्याने दुधाचे दर पडले
नीलकंठ मोहिते
इंदापूर – दुधाच्या उत्पादनामध्ये भारत देश सध्या जगामध्ये एक नंबरला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि दरात चढ-उतार होत असल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. दरवाढ ही कुठल्याही दूध उत्पादक संघाचे हातात नाही. सध्या दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी आणि दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. हे राज्यातील सर्व दूध उत्पादक कंपन्यांना माहित आहे; मात्र या पाठीमागील वास्तव म्हणजे, बाजारातील दुग्धजन्य पदार्थांची मागणी आणि पुरवठा यांचा समतोल बिघडला आहे, अशी स्पष्टोक्ती सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांनी व्यक्त दिली.
बाजारात दुग्धजन्य पदार्थांची मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आली की, उत्पादन दरामध्ये चढउतार नेहमीच होतो. सध्या देशामध्ये पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. जनावरांसाठी लागणारे पशुखाद्य हे चांगल्या दर्जाचे बनवण्यासाठी त्याला चांगल्या दर्जाचा कच्चामाल लागतो. आणि कच्च्या मालाचे दर सध्या बाजारामध्ये खूप तेजीत आहेत. पशुखाद्य बनवणार्या काही उत्पादनापैकी मका किंवा तत्सम हे परदेशांमध्ये निर्यात होतात आणि हे परदेशामध्ये निर्यात आहेत होत असल्यामुळे यांचे दर गगनाला भिडले. कच्च्या मालाचे दर वाढले की, पक्क्या मालाचा दर वाढतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठा या वरतीच आधारित हा व्यवसाय आहे.
तशीच परिस्थिती आज दुधाची आहे. आपल्याकडे उत्पादित होणार्या दुधापैकी केवळ 25 टक्के दूध पॅकिंगमध्ये जाते तर इतर 75 टक्के दुधाची पावडर व इतर पदार्थ बनविले जातात. आपल्या देशात पावडरचा साठा दोन लाख टन आहे. एप्रिलपासून हा साठा आज देशात शिल्लकच आहे. तो साठा पुढे बाजारात विकला गेला नाही तर, अनेक अडचणी वाढणार आहेत. त्याच बरोबर दही, लस्सी आणि दुधाची देखील मागणी बाजारात कमी झाली आहे. या दूध मालाला या हंगामात मागणी मागणी कमी झाली. हवामान बदलामुळे बाजारात बनवणार्या थंड प्रकारच्या उत्पादनाची मागणी कमी झाली. त्यामुळे दुधापासून बटर तयार करावे लागले.
सरकारला हस्तखेप करावा लागेल
देशात 25 ते 30 हजार टन तर महाराष्ट्रात 40 हजार टन दूध पावडर आणि जवळपास दहा हजार टन बटर शिल्लक आहे. जो पर्यंत हा माल बाहेर जात नाही, त्याची विक्री होत नाही, निर्यात होत नाही आणि निर्यातीला सरकार मदत करीत नाही तोपर्यंत दुधाचे दर वाढणे शक्य होत नाही. जे संघ दूध पॅकिंग कमी करते आणि इतर उप पदार्थ करते त्यांच्याकडे ते उपपदार्थ ठेवायला जागा नाही. मालाचा उठाव नाही. इकडे शेतकर्याला दहा दिवसाला पगार द्यावा लागतो. मग वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पगार सुरू आहेत. आता गंभीर प्रश्नांमध्ये सरकारलाच हस्तक्षेप करावा लागेल.
2018 ला दूधदरावर अधिवेशन
2018 मध्ये ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. महादेव जानकर दुग्धविकास मंत्री होते. त्यावेळी दोन दिवसांचे अधिवेशन दूध दरावरच चालले होते. फक्त अनुदान देऊन हे भागणार नाही असे त्यावेळी ठरले होते. त्यावेळी सहा महिने शेतकर्यांना महाराष्ट्र सरकारने पाच रुपये सबसिडी दिली होती. त्यातील दोन महिने तीन रुपयांची सबसिडी दिली होती. त्यामुळे दहा हजार टन पावडर निर्यात झाली व साठा कमी झाला. बाजार फिरला आणि दर वाढण्यास मदत झाली. त्या वेळेस हे दर बादले होते ते आतापर्यंत टिकून राहिले. अनेक संघांनी शासनाच्या दरापेक्षा जादा दर शेतकर्यांना दिला आहे. 2018 ला सरकारने केलेल्या मदतीचा परिणाम आजपर्यंत राहिला. आज सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा. त्याच वेळी हा दराचा प्रश्न मिटू शकतो.
दूध उत्पादनाला सपोर्ट प्राइसची गरज
आज तयार झालेला उपपदार्थांचा माल खरेदी करायला कोणी तयार नाही. पावडर खरेदी कोणी करत नाही. भविष्यात पावडरचे दर पडले तर या भीतीने कोणी खरेदी करत नाही. हे कोणाच्याच हातात नाही. दुधापासून बनल्या जाणार्या वस्तू या नाशवंत आहेत. त्यामुळे त्या हमी भावात देऊ शकत नाहीत. नाशवंत भाजीपाला, मासे, मटण याला हमीभाव नाही त्या प्रमाणे दुधाला सुद्धा हमी भाव नाही. या उत्पादनाला सपोर्ट प्राइसची गरज आहे.
चांगले पशुधन पाळा, क्रांती घडेल
शेतकर्यांच्या दुधाला चांगला दर मिळालाच पाहिजे. हे आमचे सुद्धा मत आहे. आम्ही सुद्धा शेतकर्यांची मुलं आहोत. आमच्याकडे सुद्धा जनावरे आहेत. जनावरांच्या जातीत मोठी क्रांती झाली आहे. अनेक चांगल्या प्रकारे दूध देणार्या जनावराच्या संकरित जाती आहेत. त्यांची निगाही तशीच राखावी लागते. शेतकरी बांधवांनी अशा जनावरांची जोपासना करावी, योग्य आहार, योग्य आरोग्य तपासणी करून चांगले पशुधन पाळावे, नक्कीच क्रांती घडेल, अशी अपेक्षा करतो. त्यांना आरोग्य सुविधा देऊ, ही आमची परंपरा आहे ती ती राखण्यात सोनाई परिवार कटिबध्द आहे, अशी ग्वाही दशरथ माने यांनी दिली.
दुष्काळाचे सावट, चारा छावण्या उभारा
सध्या राज्यावर दुष्काळाचे सावट आहे, खरीप आणि रब्बी पिकांची वाताहत झाली आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आमची डेअरी चालकांच्या वतीने ही मागणी आहे की, ज्या प्रमाणे 2018 ला चारा छावण्या केल्या त्याप्रमाणे छावण्या कराव्यात, छावण्यात जनावरांना चारा पाणी योग्य मिळते. त्यामुळे दूध उत्पादन घटत नाही. शेतकर्यांना मदत होते. शेतकरी अडचणीत येत नाही. सरकारने एकतर चारा द्यावा किंवा छावण्या तरी उभाराव्यात. दुधाचा व्यवसाय हा शेतकर्यांचा निम्मा प्रपंच चालवतो. चलन चालू राहते. व्यवहार फिरतात. ज्या शेतकर्यांच्या दरात जनावरे आहेत, दुधाचा धंदा आहे त्या शेतकर्यांनी आत्महत्या केली नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे.