पावसामुळे औषध फवारणीही फेल : बळीराजा निसर्गापुढे हतबल
दिवे – पुरंदर तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्याने बळीराजा हैराण झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थकरण अंजीर आणि सीताफळा या पिकांवर चालते; मात्र या पावसामुळे सध्या सीताफळ, अंजीर फळास बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. जरी पिकांवर औषध फवारणी केली तरी पावसामुळे या औषध फवारणीचा उपयोग होत नसल्याने बळीराजा निसर्गापुढे हतबल झाला आहे.
यावर्षी पाऊस दोन ते तीन महिने उशिरा सुरू झाल्यामुळे हंगाम लांबला आहे. याचा सर्वाधिक फटका सीताफळास बसला आहे. या अतिपावसामुळे सीताफळावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळ काळे पडत आहे. तर अंजीरावर तांबोरा कोळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
शेतकऱ्यांनी भर पावसात महागडी औषध फवारणी करून तांबोरा रोगांपासून अंजीर बागा कशा वाचविण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र सध्या फळावर कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने फळांची चमक कमी होत आहे, त्यामुळे बाजारात बाजारभावावर चांगलाच परिणाम होत आहे.
कोळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून अंजीर भागांचे नियमित सर्वेक्षण करत आहे कीड दिसल्यास प्रोपरगाईट 7 ते 25 मिली प्रति 10 लिटर पाणि या प्रमाणात फवारावे आहे किटक नाशक शास्त्रज्ञ नितीन घोडके यानीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. मार्गदर्शन करताना कृषी सहायक योगेश पवार कोंडीराय जरांडे, कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप यांनी अंजीर उत्पादकांना बागेमध्ये शास्त्रज्ञांच्या उपस्थित दरमहा केले असल्याचे त्यांनी सांगितले.