– माजी सभापती संजय गवारी यांचे प्रतिपादन
मंचर – निवडणुकीच्या काळात अनेक लोक येऊन आम्ही हे करतो .आम्ही ते करतो .अशा भुलथापा मारतील .त्यांच्या भूलथापांना कुणीही बळी पडू नये. धरणग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न फक्त सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे एकमेव नेते सोडवतील, असे प्रतिपादन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
कळंबई ता. आंबेगाव येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या ६० लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ माजी सभापती उषा कानडे, माजी सभापती प्रकाश घोलप, बाजार समिती संचालक निलेश स्वामी थोरात, उपसभापती सचिन पानसरे, सरपंच उषा सचिन कानडे, उपसरपंच गोकुळ भालेराव यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी माजी उपसभापती नंदकुमार सोनावणे, ग्रा.प.सदस्य ज्योती येवले, गुलाब कानडे, कमलेश वर्पे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कळंबई पुनर्वसन गावठाणमध्ये आतापर्यंत सभागृह, राष्ट्रीय पेजल योजनेतून पाणीपुरवठा योजना, आता जलजीवन योजनेअंतर्गत नव्याने पाणीपुरवठा योजना,
अंगणवाडी, शाळा, अंतर्गत रस्ते यासाठी निधी दिला होता.या वर्षामध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी वीस लक्ष रुपये, कळंब येथे सामाजिक सभागृह बांधणे दहा लक्ष रुपये, बंदिस्त गटर करणे दहा हजार रुपये, व्यायाम शाळा साहित्य ७ लक्ष रुपये, कळंबई येथे बंदिस्त गटर ४.५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.