बारामती – भटक्या विमुक्तांचे श्रद्धास्थान जेजुरीच्या खंडेराया व भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीमध्ये मैदानातील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी संघटनाच्या वतीने केली आहे. कार्यवाहीसाठी आंदोलनाचा इशारा दिला असून याबाब्त तहसीलदारांना निवेदन देण्यात आला आहे.
जेजुरीत वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी भरत असलेला गाढवांचा बाजार व भटक्या विमुक्त्यांची न्याय प्रक्रिया त्या ठिकाणी चालत होती महाराष्ट्र कर्नाटक गुजरात, या ठिकाणाहून अनेक व्यापारी गाढवांचा बाजार या ठिकाणी भरत असल्यामुळे येतात. या ठिकाणी वर्षातून एकदा भटक्या विमुक्तांचा मेळावा भरत असतो. जानेवारी महिन्यामधल्या पौष पौर्णिमेदिवशी भंगाळे मैदान या ठिकाणी जेजुरीमध्ये हा मेळावा जमत असतो. त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यामध्ये कुस्त्या रोटी बेटी व्यवहार मुलांची लग्न जमवण्याचे विषय या समाजामध्ये घडत असतात. बंगाळी मैदान हे नगरपालिकेच्या ताब्यात असून त्या ठिकाणी सध्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे प्रयोजन आहे. परंतु सामाजिक अस्मितेच्या निगडीत असलेल्या या मैदानावर भटक्या विमुक्तांच्या भावना जोडलेल्या गेलेले आहेत. यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी धर्मशाळा, सामाजिक भवन तयार करण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने करावी, अशी मागणी केली.
तरी हे मैदान समाजासाठी मुक्त करावे, यशवंत ब्रिगेड, जय मल्हार क्रांती संघटना, वैदू समाज यांच्या वतीने जेजुरी पुरंदर तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी अशा प्रकारचा बाजार भरतो. त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मढी व पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्तांच्या या पंढरीमध्ये या लोकांसाठी आरक्षित जागा असावी, याबाबत शासनाला पाठपुरावा करण्यात येणार आहे.
पुरंदर येथे तहसीलदार यांना संघटनाच्या वतीने निवेदन दिले
यावेळी ॲड. प्रियदर्शनी कोकरे, जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रवक्ते विष्णू चव्हाण, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, सामाजिक कार्यकर्ते महादेव खेंगरे पाटील, चंद्रकांत घोरपडे, रसूल शिंदे, चंद्रकांत खोमणे, जय मल्हार क्रांती संघटना सल्लागार गणपत शितकल, अप्पासाहेब भांडवलकर, बापूसाहेब मोकाशी, लालसाहेब भंडलकर, किसन महाराज, तात्यासाहेब वाघमोडे, निखिल शिंदे उपस्थित होते.