मुंबई :- भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना हा मोदीनॉमिक्सचा एक महत्त्वाचा पैलू आहे. कारण ते केवळ संपत्ती निर्माण करणारे नाही तर रोजगार निर्मितीचे साधन देखील आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या 60 वर्षांच्या राजवटीत भांडवलदारांविरुद्ध द्वेष पसरवला गेला. नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या वर्षपुर्ती निमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कॉंग्रेसच्या राजवटीत, कारभार हा बजेट-केंद्रित होता असे ते म्हणाले. दारिद्रय निर्मूलनासाठी देशांतर्गत भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि विकासासाठी परदेशी भांडवल आणणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. 900 कोटींच्या बजेटमध्ये 9 लाख कोटी रुपयांची कामे केली जात आहेत कारण मोदी सरकार भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे, भांडवली गुंतवणुकीमुळे संपत्ती आणि नोकऱ्या निर्माण होतात, यावर त्यांनी भर दिला.
गडकरी म्हणाले, मोदी सरकारमध्ये विकास आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करून पारदर्शक व कालबद्धपणे निर्णय घेतले जात आहेत. गरिबी निर्मूलन आणि सामाजिक-आर्थिक विषमता नाहीशी करणे हे मोदी सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या अंत्योदय योजनांचा समाजातील गरीब घटकांना फायदा झाला आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे साडे नऊ कोटी लोकांना लाभ झाला आहे, तर साडे तीन कोटी नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे मिळाली आहेत, असे ते म्हणाले.