Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी गाझा पट्टीमध्ये इस्रायली लष्करी दलाच्या (आयडीएफ) कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, गज्जा पट्टीतील परिस्थिती पाहता दोन्ही बाजूकडून हे युद्ध तात्काळ थांबले पाहिजे असे आवाहन केले आहे. गाझा पट्टीत इस्रायलच्या लष्करी कारवाईला पाठिंबा देणाऱ्या सरकारांवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे.
सोमवारी (13 नोव्हेंबर) प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून गाझा पट्टीतील मुलांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “किती निंदनीय आणि अपमानास्पद घटना आहे. गाझामध्ये 10 हजारांहून अधिक लोक मारले गेले, त्यापैकी जवळपास निम्मे मुले आहेत.”
पुढे त्यांनी आपली पोस्टमध्ये, ‘दर 10 मिनिटांनी एका मुलाचा मृत्यू होत आहे. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार, दर दहा मिनिटांनी एक मूल मरत आहे. आता लहान मुलांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांच्या इनक्यूबेटरमधून बाहेर काढावे लागले आणि त्यांना मरण्यासाठी सोडले गेले.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
What a deplorable and disgraceful milestone…over 10,000 people killed in Gaza of which almost half are children. One child is being killed every ten minutes according to the WHO, and now tiny babies had to be removed from their incubators due to lack of oxygen and were left to…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 13, 2023
इस्त्रायली लष्कराच्या कारवाईचे समर्थन करणाऱ्यांवरही प्रियंका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. गाझामध्ये अशी परिस्थिती असूनही या नरसंहाराचे समर्थन करणाऱ्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला धक्का बसलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. युद्धविराम नाही. फक्त अधिक बॉम्ब, अधिक हिंसा, अधिक हत्या आणि अधिक वेदना. या विनाशाचे समर्थन करणाऱ्या सरकारांना लाज वाटली पाहिजे. हे सगळे कधी संपणार ?”
दरम्यान, गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इनक्यूबेटरमध्ये दोन बाळांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवारी (12 नोव्हेंबर) गाझामधील अल शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयातून मुलांना बाहेर काढण्याचे काम करणार असल्याचे म्हटले.