नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची कमान भारतानं सांभाळली आहे. सागरी सुरक्षा, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेवर होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. यात सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय शांती या गंभीर विषयांवर चर्चा होईल. 9 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हर्चुअल बैठकीत भाग घेतील. पहिल्यांदाच एका भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या गंभीर मुद्द्यावर चर्चा होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारत जागतिक दहशदवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करत होता. माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशदवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि दहशदवाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पाकिस्तानला धारेवर धरले होते. याचा फायदा आता भारताला होताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला मोठा मान मिळाला आहे.
सागरी सुरक्षा, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा या विषयांवर एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. या विषयावर भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठका होणार आहे आणि त्याचं नेतृत्व भारत करेल. येत्या 9 ऑगस्टला ही वर्च्युअल बैठक होणार आहे.
पहिल्यांदाच एका महत्वाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा मान हा भारताला मिळाला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भारतीय असतील. त्यामुळे भारताचे हे मोठे राजनैतिक यश मानलं जात आहे. भारत तीन उच्चस्तरीय बैठका घेईल. ज्यात शांतता राखणे, दहशतवादाविरोधात कारवाई आणि सागरी सुरक्षेसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले जातील, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधी टीएस तिरूमुर्ती यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून भारताला स्थायी सदस्य देण्याची मागणी केली जात आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देशांचा समावेश आहेत. त्यापैकी 10 अस्थायी तर, 5 स्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत.