नवी दिल्ली :- चीनच्या अतिक्रमणांवर मोदींनी सतत बाळगलेले मौन आणि घुसखोरीबद्दल चीनला त्यांनी दिलेली क्लीन चीट यामुळे द्विपक्षीय वाटाघाटीतील भारताची स्थिती कमकुवत झाली आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर तीन वर्षांपूर्वी मोदींनी दिलेले एक भाषण शेअर केले आहे, ज्यामध्ये मोदींनी म्हटले होते की, कोणीही भारतीय हद्दीत प्रवेश केलेला नाही आणि कोणीही त्यावर कब्जा केला नाही.
तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी चीनला ही क्लीन चिट दिली. त्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे आणि पुढेही होत राहील. चिनी आक्रमणाच्या बाबतीत संसदेत आणि बाहेरही मोदींनी सतत मौनच बाळगले आहे. त्यामुळे भारताची स्थिती कमकुवत झाली आहे.
द्विक्षीय वाटाघाटीच्यावेळी भारताला आता ठाम भूमिका घेणे जड जाणार आहे असे त्यांनी सूचित केले आहे.