पिंपरी (प्रतिनिधी) – गेली चार दिवसांपासून धुके व पावसाच्या हजेरीने फळभाज्यांच्या उत्पादनासह आवकेवर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची 30 ते 35 टक्क्यांनी आवक घटली आहे. तर कांदा, बटाटा, वाटाणा व गाजर वगळता अन्य भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.
वातावरणातील थंडी भाजीपाल्याच्या वाढीकरिता पोषक आहे. मात्र, धुके व पावसाचा मोठा फटका बसत आहे. सध्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आह पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र अनेक भागात दिसत आहे.
पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाऊक बाजारात भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे.
कांदा-, बटाट्याची आवक स्थिर असून, वाटाणाव गाजराची आवक घटली आहे. तर दर मात्र स्थिर आहेत.
राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले आहे. तसेच ढगाळवातावरणाची शक्यताही दिसत नाही. काही ठिकाणी सकाळी हवेतील गारवा जाणवत आहे. पुढील काळात हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे.