Asaduddin Owaisi On Partition Of India: AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना देशाची फाळणी दुर्दैवी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, देशाची फाळणी व्हायला नको होती.
ओवेसी यांनी देशाच्या फाळणीला ‘ऐतिहासिक चूक’ ठरवून एका ओळीत याचे उत्तर देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासाठी फाळणीच्या काळातील नेत्यांना जबाबदार धरले. तसेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला.
ऐतिहासिक चुकीचे उत्तर एका ओळीत देऊ शकत नाही –
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, असदुद्दीन ओवेसी हैदराबादमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ऐतिहासिकदृष्ट्या हा एक देश होता आणि दुर्दैवाने तो विभागला गेला. मी एवढेच सांगू शकतो की, असे घडायला नको होते. तुम्हाला हवे असेल तर डिबेट करा आणि मी तुम्हाला सांगेन की या देशाच्या फाळणीला कोण जबाबदार आहे… त्या वेळी झालेल्या ऐतिहासिक चुकीचे मी एका ओळीत उत्तर देऊ शकत नाही.
मौलाना आझाद यांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला –
ओवेसी पुढे म्हणाले, या देशाची फाळणी व्हायला नको होती. ते चुकीचा होते. त्यावेळी असलेले सर्व नेते (फाळणीला) जबाबदार होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे ‘इंडिया विन्स फ्रीडम’ हे पुस्तक वाचले तर देशाची फाळणी होऊ नये, अशी विनंती मौलाना आझाद यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना केली होती.
असदुद्दीन यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा तेलंगणामध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपशिवाय ओवेसी काँग्रेसविरोधातही आक्रमक दिसत आहेत.