Pankaja munde on Rajysabha।आगामी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ आलीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र केंद्रात जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या पंकजा मुंडे यांनी याविषयी एक महत्वाचे विधान केलंय. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
दगाफटका, राजकीय वनवास…Pankaja munde on Rajysabha।
पकंजा मुंडे यांनी गावं चलो अभियानांतर्गत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या राज्यसभे जाण्याच्या चर्चवर बोलताना आपल्याला दगाफटका बसला असल्याचे म्हटले आहे. तसेच “वनवासात तुम्ही लोकांच्या स्मरणात राहात नाहीत. तो वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या मनात, हृदयात राहात नाही.”
हेही वाचा
पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
“मला राजकारणात वनवास झाला. दगाफटका झाला. पण तो कशासाठी झाला? तुम्ही एवढं प्रेम माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. मग मला तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागले. विश्वास ठेवायला लागले. हा माझ्यासाठी झालेला फार मोठा बदल आहे”, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले.
प्रत्येक निवडणुकीत माझं नाव येतंच Pankaja munde on Rajysabha।
“गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझं नाव नव्हतं? विधानसभा, राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं. त्या हिशेबाने लोक माझं नाव घेतात. आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही. त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात. त्यावर मी काहीही करू शकत नाही”, असे त्यांनी म्हटले.