Budhni Manjhiyan – झारखंडमधील बुधनी मांझियान यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. गेल्या 70 वर्षांपासून त्या स्वत:च्या जात आणि समाजाच्या बहिष्काराचा सामना करत होत्या. बुधनी मांझियान यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या पंचेत धरण आणि जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत केले. पण, या दिवसानंतर बुधनी मांझियान यांच्या जाती-समाजाने त्याच्या तिरस्काराची ओढली, जी त्या आयुष्यभर सहन करत राहिल्या.
बुधनी मांझियांची संपूर्ण आगळीवेगळी आहे. या कथेची सुरुवात ६ डिसेंबर १९५९ झाली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात DVC (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) ने बांधलेल्या पंचेत धरण आणि हायडल पॉवर प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पंडित नेहरूंचे स्वागत झारखंडच्या संथाली आदिवासी समाजातील मुलगी बुधनी मांझी करणार असल्याचे ठरले.
या धरणाच्या बांधकामादरम्यान बुधनी मांझियान या मजूर म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 15 वर्षे होते. पारंपारिक आदिवासी पोशाख आणि दागिने परिधान केलेल्या बुधनी यांनी पंडित नेहरूंचे स्वागत केले आणि त्यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी पंडित नेहरूंनी आदर करण्याच्या हेतूने स्वःताच्या गळ्यातील माळ काढून बुधनी यांच्या गळ्यात टाकली. पंडित नेहरूंनी बुधनी यांच्या हस्ते बटन दाबून जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही केले. पण या १५ वर्षांच्या मुलीसाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत मिळालेला आदर तिच्याच समाजात तिची अवहेलना आणि बहिष्काराचे कारण ठरेल…
दरम्यान, संथाल आदिवासी समाजात अशी परंपरा होती की कोणतीही मुलगी किंवा स्त्री कोणत्याही पुरुषाला हार घालत नाही. मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष एकमेकांना हार घालत असतील तर तो विवाह समजला जाईल. त्यामुळे पंडित नेहरूंनी आदरपूर्वक बुधनी यांच्या गळ्यात जी माला घातली, ती बुधनी यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली. बुधनी यांनी पंचेत धरण आणि जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केल्याची बातमी आणि चित्रे दुसऱ्या दिवशी देशातील सर्व वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली, मात्र संथाल आदिवासी समाजात या घडामोडीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
यांनतर समाजाने पंचायत बोलावली आणि बुधनीचा नेहरूंशी विवाह झाल्याचे जाहीर केले. पंचायतने सर्वाना सांगतले, ती आयुष्यभर नेहरूंची पत्नी मानली जाईल. नेहरू हे संथाल-आदिवासी समाजाबाहेरील व्यक्ती असल्याने बुधनी यांचा संथाल समाजाशी संबंध राहणार नाही. पंचायतीच्या घोषणेनंतर घर, कुटुंब आणि समाजात बुधनीला स्थान मिळणार नाही. त्यांचे वडिलोपार्जित गावही पानशेत धरणाच्या बुडीत क्षेत्राखाली आले होते आणि त्यांचे कुटुंब विस्थापित होऊन दुसऱ्या ठिकाणी गेले होते.
दरम्यान, बुधनी यांना डीव्हीसीमध्ये मजूर म्हणून नोकरी मिळाली, परंतु 1962 मध्ये त्यांना अज्ञात कारणांमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आदिवासी समाजाच्या आंदोलनामुळे आणि विरोधामुळे डीव्हीसीने त्यांना हटवल्याचे सांगण्यात येते. यानंतर त्या कामाच्या शोधात बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील सालतोड येथे गेल्या आणि तेथे त्यांची सुधीर दत्ता नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. सुधीरने त्यांना आपल्या घरी नेले, जिथे दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. मात्र, दोघांचेही औपचारिक लग्न झाले नव्हते. बुधनी यांना दत्तापासून एक मुलगीही आहे. वर्षांनंतरही संथाल समाजाने बुधनी आणि तिच्या कुटुंबावरील बहिष्कार मागे घेतला नाही. सुधीर आणि बुधनी यांच्या मुलीचे नाव रत्ना आहे.
अशात, बुधनी मांझियानला निरोप देण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांसह शेकडो लोक आले होते. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बुधनी मांझियान यांचे देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची ‘पहिली आदिवासी पत्नी’ असे वर्णन केले. तेथे उपस्थित लोकांनी स्थानिक उद्यानातील नेहरूंच्या पुतळ्याशेजारी बुधनी यांच्या सन्मानार्थ स्मारकाची मागणी केली. बुधनी यांची मुलगी रत्ना (60) हिच्या पेन्शनची मागणीही त्यांनी केली.