वाल्हे, दि. 22 (वार्ताहर) -येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी व वाल्हे परिसरासाठी ऑक्सिजन पार्क बनेल, असा विश्वास जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केला. येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळाच्या प्रांगणामध्ये आज (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, समदास भुजबळ, प्रा. संतोष नवले, सत्यंवान सुर्यवंशी, उद्योजक गोरख कदम, विद्यार्थी राष्टवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संदेश पवार, डॉ.रोहिदास पवार, चंद्रशेखर दुर्गाडे, विक्रम फाळके, दिपक कुमठेकर, संतोष दुर्गाडे, आकाश भुजबळ उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर वाल्हे येथील डोंबारी समाजातील मुलांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवन दुर्गाडे, अभिषेक दुर्गाडे, शहाजी भुजबळ, सागर दुर्गाडे, अमोल दुर्गाडे, मंगेश दुर्गाडे, स्वनिल दुर्गाडे व वृक्ष संवर्धन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. तसेच वृक्षसंवर्धन ग्रुपच्या सदस्यांनी पालखी मैदानामध्ये लावलेले वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली असल्याची माहिती अमोल दुर्गाडे यांनी दिली.