T20 WorldCup – टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल, याबाबत वीरेंद्र सेहवागने ( Virendra Sehwag ) मोठी भविष्यवाणी केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, सेहवागने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारताच्या विराट कोहली किंवा सूर्यकुमार यादवचे नाव घेतलेले नाही. सूर्यकुमार यंदाच्या सालात जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने भारतासाठी गतवर्षी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच तो टी-२० क्रमवारीतही दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर विराट कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला आहे. असे असतानाही सेहवागने ( Virendra Sehwag ) या दोघांकडे दुर्लक्ष करत एका पाकिस्तानी फलंदाजाचे नाव घेतले आहे.
T 20 वर्ल्डकप पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहचली धनश्री,पोस्ट शेअर करत उर्वशीला लगावला टोला
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम २०२२ च्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो, असे सेहवागने म्हटले आहे. तसे पाहिले तर बाबर सध्या काही खास फॉर्ममध्ये नसून त्याला टी-२० क्रमवारीतील पहिले स्थानही गमवावे लागले आहे. असे असतानाही सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत बाबर आझम सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल, असा अंदाज सेहवागने ( Virendra Sehwag ) व्यक्त केला आहे.
एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना सेहवाग ( Virendra Sehwag ) म्हणाला की, “पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मागील काही काळापासून शानदार फलंदाजी करत आहे. त्याला फलंदाजी करताना पाहायला छान वाटते, जसे की तुम्ही विराट कोहलीची फलंदाजी पाहून आनंदित होतात. त्याप्रमाणे बाबर आझमची फलंदाजी पाहण्यास चाहते नेहमी उत्सुक असतात.”
सेहवागचा ( Virendra Sehwag ) खेळाडूंमधील कौशल्य ओळखण्याचा दृष्टिकोन उत्कृष्टअसल्याचे समोर आले आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने म्हटले होते की, सेहवागनेच कसोटी क्रिकेटसाठी असलेली त्याच्यातील प्रतिभा ओळखली होती. जेव्हा तो सेहवागच्या नेतृत्वाखाली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत होता तेव्हा सेहवाग म्हणाला होता की, वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. काही काळानंतर वॉर्नरला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात संधी मिळाली आणि वॉर्नरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.