सातारा -बेघर, अनाथ व निराधार बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने राज्य शासनाने बाल संगोपन योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत संबधित बालकाच्या संगोपणासाठी मासिक 1225 रुपये दिले जात होते. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अशा बालकांच्या संगोपणासाठी आता शासन मासिक 2500 रुपये देणार आहे.
काय आहे बालसंगोपन योजना
एखाद्या बालकाचे आई-वडील एखाद्या कारणामुळे मृत्यूमुखी पडतात अथवा एखादे बालक अनाथ झाल्याने त्याला शिक्षण, आरोग्य व इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा बालकांना या योजनेअंतर्गत वयाच्या 18 वर्षापर्यंत पालन, पोषण, शिक्षण प्रदान करणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
योजनेचा लाभ कोणाला घेतो येतो?
ज्या मुलांच्या आई-वडीलांचा अथवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, आई-वडील दुर्दर आजाराने त्रस्त आहेत, एखाद्या गुन्ह्यात कारावार भोगत असलेल्या बंदीवानाची बालके, बेघर, निराधार अथवा ज्यांना शारीरिक व्यंग आहे अशा 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या बालकांना या योजनेचा लाभ घेता आहे.
जिल्ह्यात 800 लाभार्थी
करोना संक्रमण काळात सातारा जिल्ह्यातील अनेक बालकांनी आपले आई-वडील गमावले. महिला व बालविकास विभागाकडून बालसंगोपण योजनेंतर्गत अशा 800 मुलांना जुन्या तरतुदीप्रमाणे सुमारे 80 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
असा करावा लागेल अर्ज
बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल व महिला व बालविकास विभाग कार्यालय जाऊन अधिकाजयाकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज संबंधित अधिकाजयांकडे जमा करावा लागेल.
कोणत्याही कारणाने अनाथ झालेल्या अथवा बेघर, निराधार, दुर्दर आजाराने ग्रस्त बांलकांचे भवितव्य अंधारमय होऊ नये, त्यांचे योग्य रित्या संगोपण व्हावे यासाठी शासानने बाल संगोपण योजना सुरू केली आहे. महिला व बालविकास विभागाकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आता बालकांना संगोपणासाठी शासनाच्या नवीन निर्णयानुसार अर्थ सहाय्य दिले जाणार आहे.
विजय तावरे , महिला व बालविकास अधिकारी