मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी लक्षवेधी मांडत उपस्थित केले आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही केला. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलीकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सरकारकडून वाढला आहे. पेनड्राइव्ह मी अध्यक्षांना सुपूर्द करत आहे. सरकार कशा प्रकारचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राइव्हमध्ये दिले आहे.
दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आणि आता या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील आपले मत मांडले आहे. “सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, सुत्रधार कळेल. सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि वृत्तपत्रात जागा मिळवण्यासाठी विरोधक असं आरोप करत असतात.” असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की.., “आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं. एखाद्या नेत्याविरोधात असं खोटं षडयंत्र रचणं अशी शिकवण महाराष्ट्रातील पोलिसांना नाही. तशी शिकवण घ्यायला केंद्रीय यंत्रणांकडून धडे घ्यावे लागतील. उगाच सनसनाटी निर्माण करुन महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे’. असं ते म्हणाले.