मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पूर्वीच असे भाष्य केले होते, ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय या मागची भूमिका महत्वाची आहे.
सर्वोच्च न्यायालयात आपण गंभीरपणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरलो, अशी टीका करतानाच त्यामुळे ओबीसी आरक्षणासमोरचे प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेआहे, असे त्यांनी नमूद केले.तसेच, सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे की निवडणुका जाहीर करा.
पण तरीही राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे? या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकाच्या अख्त्यारीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? राज्य सरकार मंत्रीमंडळात एक विशेष निर्णय घेऊन, आम्ही ओबीसी आरक्षणाबरोबरच निवडणुका घेऊ अशी भूमिका घेणार आहे का? याकडे आता माझे लक्ष आहे असे देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.