मुंबई – राज्यात भोंग्यांचा विषय लाऊन धरून भोंगेबाज राजकारण्यांनी जो गोंधळ माजवला आहे, त्यात हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला गेला असून त्यांच्या आंदोलनामुळे आज शिर्डी आणि त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातही पहाटेच्या कार्यक्रमाचा आनंद भक्तांना घेता आला नाही, या महत्वाच्या मंदिरांवरील भोंगेही आज पहाटे बंद ठेवावे लागले समस्य हिंदुंसाठी हा काळा दिवस आहे अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
ते म्हणाले की निर्बंधांच्या आग्रहामुळे अनेक मंदिरांमध्ये पहाटेच्यावेळी काकड आरतीचा कार्यक्रम ऐकता आला नाही. पण आज भोंग्यांचे निमीत्त करून भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने (मनसे) हिंदुंचा गळा घोटाला आहे अशी तीक्ष्ण प्रतिक्रीयाही राऊत यांनी दिली आहे.
ते म्हणाले की पहाटेच्या काकड आरतीच्यावेळी खूप कमी लोकांना मंदिरात जाण्याची संधी मिळते. त्यांना लाऊडस्पीकरद्वारे घरबसल्या त्याचा आनंद घेता येतो. पंच्रक्रोशीतील गावकरी हा आनंद घेत असतात पण आज मात्र ते या आनंदाला हिरावले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही येथे लाऊडस्पीकरवर हा आनंद घेता येत असे पण शिर्डी पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार तेथील ही सेवा आज बंद पडली त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली असे त्यांनी नमूद केले.