देशात कोरोना असल्याने फाशीसाठी योग्य वेळ नसल्याचा दोषींचा दावा
नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना विषाणूने सगळीकडेच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच जात आहे. याच परिस्थितीचा फायदा हा आता निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींनी घेतला आहे. देशाला हादरुन सोडणाऱ्या प्रकरणातील दोषींनी आपली फाशी टाळण्यासाठी रोज नवनवीन कारणे देत आहेत. यावेळी या सर्व दोषींनी कोरोनाचा आधार घेतला आहे.
देशात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचाच आधार घेत निर्भया प्रकरणातील दोषींनी दिल्ली पटीयाला न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी कोरोनाविषयी देशातील एकंदरीतच परिस्थिती पाहता फाशी देण्याची टाळण्याची मागणी केली आहे. ही याचिका करताना दोषींनी वेगवेगळ्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. तसेच देशातील ही वेळ फाशी देण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.