मुंबई – करोनाचा व्हायरस हळूहळू वाढतोय. तरीही काळजीची गरज नाही. परंतु, गर्दी अजून कमी व्हायला हवी. सरकारने दिलेल्या सूचना पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, घाबरून युद्ध जिंकलं जात नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. सरकारी यंत्रणा जिवाची परवा न करत लढत आहे. सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी सर्व पाळाव्या. राज्यात आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. लोकल, बसमधील गर्दी ओसरली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारनं दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी. सरकार काही गोष्टी बंद करू शकतं, पण तसं करण्याची सरकारची इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले.
तसेच ज्याला हा आजार झाला ती व्यक्ती अपराधी नाही. त्यांनी आपला परदेशवारीचा इतिहास लपवू नये. जर त्यांनी असं केलं तर ते चूक आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा सुरू करत आहोत. ज्यांच्यात करोनाची लक्षण आढळली त्यांच्यासाठी आयसोलेशनचीही सुविधा सुरू करत आहोत.
राज्यातील चाचणी केंद्र सुरू करण्यावर आज पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील चाचणी केंद्र वाढवण्यासही ते मदतीसाठी तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: I have spoken to the Prime Minister, he has promised full cooperation from the Central Government. #Coronavirus https://t.co/PfritX7PPl
— ANI (@ANI) March 19, 2020