मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा (बुधवारी दि . ३० सप्टेंबर) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाअध्यक्ष ‘रुपाली चाकणकर’ यांनीही या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या संपूर्ण घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा. असं त्यांनी म्हंटल आहे.
#Hathras येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा.#justice_for_manishawalmiki@supriya_sule pic.twitter.com/rynxkB5Mdi
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 1, 2020
यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेश येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा.
यासाठी पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.मी ही पत्र पाठवले आहे. pic.twitter.com/vU9Qc72559
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 1, 2020