चंद्रपूर- चंद्रपूर शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘नो मास्क नो सवारी’ हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्या अभियानासाठी सगळ्या रिक्षाचालकांनी पसंती दर्शवली आहे. काही दिवसात नाही तर उद्यापासूनच या मोहीमेला सुरुवात होणार आहे.
राज्यात अनलॉकिंगनंतर प्रवासावरील बंधने हळूहळू दूर होत आहेत. पण कोरोनाचा प्रसारही वेगाने होत आहे. हे पाहता आता अनेक शहरांमध्ये नो मास्क नो एन्ट्रीसारखे प्रयोग सुरु करण्यात आलेत.
या अंतर्गत मास्क न घातलेल्या प्रवाशाला वाहनात प्रवेश न देण्याचे निर्देश रिक्षा-टॅक्सीचालकांना देण्यात आलेत. याचे पालन केले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल. तर दुसरी कडे नो मास्क नो एन्ट्री असं सांगत कल्याण डोंबिवलीमध्ये कोकण विभाग रिक्षा महासंघानेही पुढाकार घेतला आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांनाही मास्क बंधनकारक असेल, तेव्हा सर्वांनी या नियमाचं पालन करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.