पुणे – भामा-आसखेड योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नेमके किती अनुदान भरपाईची रक्कम म्हणून द्यायची याचा नेमका आकडाच जिल्हा प्रशासनाकडे नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत या भरपाईसाठी 70 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. मात्र, अजून किती रक्कम द्यायची ही माहितीच जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी बोलवलेल्या आढावा बैठकीत देता आला नाही.
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा सिंचन फेरस्थापना खर्च माफ केला आहे. त्या बदल्यात दोन्ही महापालिकांनी या धरणामुळे बाधीत झालेल्या धरणग्रस्तांना प्रती हेक्टर 15 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, दोन्ही महापालिकांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही महापालिकांनी निधी तयार असून नेमका किती द्यायचा याची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी निधीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देता आली नाही.