Nitin Gadkari । भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांचा स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा रोखठोक स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत.
या शिवाय ते त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांबाबतच्या संकल्पनासाठी चर्चेत असतात. सरकारी योजना सांगतांना जर त्यात काही चुकीचे असेल तर ते सर्वांसमोर त्या बाबत बोलायला मागे पुढे पाहत नाही. अशात नुकताच एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या व्हिडिओला काँग्रेस पक्षाच्या ट्विट खात्यावर शेअर करण्यात आले असून यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
मुलाखतीत नितीन गडकरींनी पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषांवर छेडलेल्या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे. भूमिका मांडली आहे. त्यात देशातला शेतकरी, मजूर, गरीब आज दु:खी असल्याचं गडकरी म्हणाले आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी
शेतकरी आंदोलनाबाबत नितीन गडकरींना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “तांदूळ, मका, साखर, गव्हाचं अतिरिक्त उत्पादन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हरियाणामध्ये तर गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म वापरावे लागले. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाहीये”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
हेही वाचा
Sara Ali Khan। ‘योद्धा’ चित्रपटात सारा अली खानचा सरप्राईज रोल ?